बांबू सिंचन प्रणाली


बांबू सिंचन प्रणाली 
   बांबूच्या पाइप्सचा वापर करून नद्यांचे पाणी घेण्याची २०० वर्षांची परंपरा आहे. मुख्यतः भारताच्या ईशान्य भागात, विशेषतः मेघालयात याचा वापर केला जातो. याला कोणत्‍याही इंधन किंवा ऊर्जेची
आवश्यकता नसते. हे भूप्रदेशाच्या उतारामुळे हे शक्‍य होते. बांबू निःशुल्‍क किंवा अत्‍यंत कमी किमतीत उपलब्‍ध असेल, अशा ठिकाणी हे लागू केले जाऊ शकते.

हरित इमारत
हरित इमारत किंवा शाश्वत रचना म्‍हणजे संसाधनांचा कार्यक्षम वापर, यामध्येक्षेत्र निवड,रचना बांधकाम व देखभाल यांच्या दरम्‍यान पर्यावरण व मानवी आरोग्‍यावर होणारे परिणाम कमी करते.
हरित इमारतीच्या रचनेमध्ये ५ मुख्य घटक आहेत. जसे, बांधकाम सामग्री, ऊर्जा, पाणी व आरोग्‍य व चार R तत्‍त्‍वे - (कमी करा (Reduce), पुनर्वापर करा (Reuse), पुनर्चक्रीकरण (Recycle) व पुनर्प्राप्ती करा (Recover))
   इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल (आयजीबीसी) २००१ ही भारतात निवासी क्षेत्रासाठी हरित इमारतींच्या चळवळीचे नेतृत्व करीत आहे.

धोकादायक कीडनाशके
जागतिक विकासाच्या अहवालानुसार, दरवर्षी कीडनाशकाच्या विषारी परिणामामुळे सुमारे ४०,००० लोक मरतात आणि १ ते २ दशलक्ष लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कीडनाशकांचा त्रास होतो. सर्वांत धोकादायक कीटकनाशके बीएचसी, डीडीटी, क्लोराडेन, अल्ड्रिन, एंड्रिन, राउंडअप, इन्डोसल्‍फान इत्‍यादी आहेत.