पाणी फाउंडेशन
दुष्काळमुक्तीची लोकचळवळ‘पाणी फाउंडेशन’ ही संस्था २०१६ मध्ये स्थापन झाली. लोकसहभागाचे सामर्थ्य वापरून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचे, असे ध्येय निश्चित करून पाणी फाउंडेशनची निर्मिती झाली.
पाणीटंचाईच्या समस्येला फक्त निसर्ग नाही, तर मानवही जबाबदार आहे, म्हणूनच दुष्काळाची समस्या सोडवायची असेल तर लोकांनीच एकत्र येऊन ही चळवळ हाती घेतली पाहिजे. पाणी फाउंडेशन गावकऱ्यांसाठी सर्व तांत्रिक बाबींबरोबरच नेतृत्व कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षण देते. सोप्या भाषेतील प्रशिक्षण, माहितीपट व माहितीपत्रके यांद्वारे पाणी फाउंडेशन टीम पूर्ण राज्यभर कार्यरत आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पाणी फाउंडेशन दरवर्षी ‘सत्यमेव जयते वाॅटर कप’ स्पर्धा भरवते. या स्पर्धेद्वारे सर्वोत्कृष्ट पाणलोट व्यवस्थापनाचे बक्षीस मिळवण्यासाठी गावांमध्ये चुरस लागते. २०१६ मध्ये ११६ गावांपासून सुरू झालेली ही चळवळ २०१९ मध्ये ४००० हून जास्त गावांत पसरली आहे. त्यातून २३,००० कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता असणारी जल संधारण कामे झाली आहेत.
यावरून हे दिसून येते की, वॉटर कप ही फक्त स्पर्धा नसून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठीची प्रेरणा आहे
|
पर्जन्याबद्दल अधिक जाणून घ्या
पावसाचे पाणी पुण्यात/आपल्या शहरात आपण किती संवर्धित करू शकता?
समजा, तुम्ही पुणे शहरात राहता. तुमच्या घराच्या छताचे आकार/क्षेत्र १००चौरस मीटर आहे. एका वर्षामध्ये तुम्ही किती पावसाचे पाणी गोळा करू
शकता?
पुण्यात सरासरी वार्षिक पर्जन्यमान = ७६० मिमी.
१०० चौ. मी. क्षेत्रफळावर पडणारे पावसाचे पाणी
= छताचे क्षेत्र ´ पाऊस
= १०० चौ. मी. क्षेत्र ´ 0.७६ मी
= ७६ क्युमीटर.
= ७६,००० लीटर
|
सजीवांमधील सर्व पेशींना पोषकद्रव्ये पोहोचवण्याचे काम पाणी करते.
आपल्या शरीरात खनिजे, जीवनसत्त्वे, अमिनो आम्ले, ग्लुकोज व इतर पदार्थ शोषण्यास व शरीरात सामावून घेण्यास पाणी साहाय्य करते.
पाणी हे विषारी व नको असलेली द्रव्ये उत्सर्जित करते. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते.
मानवी शरीरात वजनाच्या सरासरी ६०% पाणी असते, तसेच शरीर पाणी साठवून ठेवू शकत नाही.आपल्या शरीरातून रोज उच्छ्वासावाटे घाम आणि मलमूत्राद्वारे सतत पाणी बाहेर पडत असते. हे गेलेले द्रवपदार्थ वेळच्या वेळी पुन्हा भरून काढणे हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
|